Saturday, May 23, 2020

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज माध्यमाच्या साहाय्याने आता कुठे तरी या विषयाला वाचा फुटत आहे.  

प्रमोदच सुरु असलेल्या मासिक पाळीच्या संशोधनावरून हि बाब लक्षात आली आणि मह्त्वाचंही वाटलं. जनजागृती झालीच पाहिजे. मासिक पाळी विषय खूप मोठा आहे यावर बोलायची सुरुवातच करायची म्हटलं तर साधारण १२-१३ वर्षाच्या मुलींपासून करायला हवी. सध्याचं वातावरण पाहता पाळी लवकर हि येऊ शकते साधारण १० वर्षांपासून. मासिक पाळी म्हणजे काय? पहिल्यांदा जेव्हा मासिक पाळी येते  तेव्हा काय काळजी हवी? ह्या गोष्टी  महत्वाच्या आहे कारण भारतात नेमकं याच विषयावर जास्त बोलल जात नाही. आई विचार करते जेव्हा पाळी सुरु होईल तेव्हा सांगू आपल्या मुलीला पण जेव्हा पहिल्यांदा रक्त येते तेव्हा ती मुलगी जास्त घाबरून जाते. हे काय होतंय समजत नाही म्हणून प्रमोद ने आपल्या घरापासूनच सुरुवात करावी असं ठरवलं आणि अवनीला म्हणजेच आपल्या बहिणीला पत्र लिहिलं. 

प्रिय अवनी ,
    आज दादाने असं पत्र का दिल माझ्या हातात असा प्रश्न पडला असेल तुला. आपण जरी एकमेकांच्या खूप जवळ असलो तरी या पत्रात मी तुला जे  काही सांगणार आहे ते तू शांतपणे बसून नीट वाच आणि समजून घे. तुला मासिक पाळी म्हणजे काय हे समजलं कि आपण तुझ्या प्रश्नांचं निरसन करूया. 
     तू आता १० वर्षांची आहेस म्हणजे तुला पुढील १-२ वर्षांत कधीही मासिक पाळी म्हणजेच तुझी (Menstrual Cycle) सुरु होईल. पहिल्या दिवशी थोडा रक्तस्त्राव होईल पण तू घाबरू नकोस. तुझ्या कपाटात मी एक कापड ठेवलं आहे त्याचा वापर तुला या ४-५ दिवसात करायचा आहे. तुझी पाळी सुरु होईल तसेच तुझ्या मैत्रिणींना पण हे सुरु होईल मग तुमच्यात हळू हळू चर्चा सुरु होईल. तू सुद्धा चर्चेत भाग घे यात लाज्ण्यासारखं काहीच नाहीये. तुला कोणी म्हणेल काय त्रास दिलाय मुलींनाच देवाने? 
    हा त्रास नाहीये अवनी, हे तर देवाने दिलेलं वरदान आहे तुम्हा मुलींना. गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून दर महिन्याला अंतरत्वचा बाहेर टाकली जाते त्याला 'मासिक पाळी' म्हणतात. हे ४-५ दिवस जितकं आनंदात घालवता येतील  घालावं.   थोडं पोटात दुखेल पण तू जर नियमित व्यायाम, पौष्टिक संतुलित आहार ठेवलास ना तर तुला  थांबेल. 
    या गोष्टी तू जितकं बोलशील तितकीच तुला मदत होईल. तुला तर माहीतच आहे मी संशोधन करत आहे, तू विचारायचीस ना तू काय शोधात आहेस दादा तर मी हेच शोधत आहे कि तुम्हा स्त्रियांना कोणत्या अडचणींना  द्यावं लागत? काय समस्या येतात? तर मला या दरम्यान हे समजलं कि आपल्या शहरासारख्या ठिकाणी राहणाऱ्या मुलींना या विषयावर बोलायचंच नसतं. उलट ग्रामीण भागात हि गोष्ट समजून घेऊन त्यावर चर्चा केली जाते आणि येणाऱ्या समस्या सोडवल्या जातात. 
    शहरातल्या मुलींना आपण कापड वापरतो हे सांगायला त्यांना लाज वाटते. खरं तर कापडाचा वापर करण हेच योग्य आहे हे जितकं ग्रामीण भागातल्या स्त्रियांना कळत ते शहरातल्या स्त्रिया समजून घेत नाही. हि गोष्ट तुही समजून घे, कापड आपण आपल्या हाताने स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळवून वापरू शकतो. अर्थात घरी असेल तर या गोष्टी करता येतील पण आजकाल मुलींना कामानिमित्त १२-१२ तास घरापासून लांब रहावं लागतं म्हणून sanitary napkin चा वापर केला जातो.   
    तुझी पहिली पाळी कधी  काही आपल्या हातात नाहीये म्हणजे तू तेव्हा कुठे असशील? घरात असेल कि शाळेत? तू घरी असली तर घरात आई आहे बाबा आहे आणि कोणी नसलं तर मला निसंकोचपनणे सांगायचं. घाबरून जायचं नाहीस. समजा तू शाळेत असली तर तुझ्या बाईंना किंवा गुरुजींना  सांगायचं यात लाज वाटू द्यायची नाही.    
    

Friday, May 8, 2020

जेवणाची थाळी स्टेटस वर ठेवणार्यांनो😡

जेवणाची थाळी व्हाट्स ऍप वर स्टेटस म्हणून ठेवणाऱ्यानो एकदा वाचाच ।




तुमच्या सगळ्या नातेवाईक,मित्र मंडीळीना एव्हाना समजलं असेल तुम्ही खाण्याचे किती शौकीन आहात . तुम्हाला किती छान स्वयंपाक येतो आणि सध्या लॉक डाउन चा तुम्ही किती सदुपयोग केला आहे . हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणी कस वागायचं कस जगायचं. पण आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्याच भान ठेवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे असं आपलं संविधान सुद्धा सांगत.
जसं आपल्या देशावर संकट ओढवलं आहे देशावरच नव्हे तर पूर्ण जगावर तस जणू आपण ते सेलेब्रेट च  करतोय कोणी स्टेटस ठेवतंय चांगले पदार्थ करून तर कोणी छान नटून वेगवेगळे challenges स्वीकारतंय, हो अगदी मी हि तेच केलं पण अचानक एक दिवस माझी मैत्रीन जी विरार ला राहते जिचे वडील सध्या पोलीस म्हणुन कार्यरत आहे तिला फोन लावला . काळजी वाटली म्हणून फोन केला बोलून झाल्यावर तिला सहज विचारलं का ग जेवण झालं का ? तर ती  बोलली नाही अजून पप्पा आले नाही, आले कि सोबत जेवू. 
फोन ठेवला आणि मनात एकच चक्र सुरु झालं ज्यांच्या घरचे आज  देशासाठी झटताय त्यांच्या घाशा खाली घास तरी उतरत असेल का? त्यांच्या मुलांना पण वाटत असेल ना आपण छान छान खावं, त्यांच्या बायकांना वाटत असेल ना नटून एखादा फोटो काढावा.
आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे आपण काय करावं काय करू नए पण माणुसकी प्रत्येकात असतेच.  ते लढताय आपल्या साठीच, त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ आली त्यात त्यांचा काय दोष ?  त्यांच्यात जास्त प्रसार होतोय ह्या विषाणूचा ,  त्यांचं काय चुकलं?  आपल्या साठीच करताय ना मग आपण त्यांचा साठी थोडं करूया . समजा आपलं कोणी त्या जागी असेल तर आपल्याला तेवढच वाईट वाटेल जेवढ आज त्यांना वाटतंय. नाही का?



हा फोटो बघून आज कोणती तरी आई आपल्या मुलाला /मुलीला प्रोत्साहित करेल का ?
विचार करण्या सारखी गोष्ट आहे मी सुद्धा त्याच चुका केल्या पण त्याची जाणीव आज होतेय.
मजूर स्थलांतर करीत आहे त्यात  किती तरी स्त्रिया ओल्या बाळंतीण आहेत त्यांचा विचार करून बघा खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही त्यांच्या बाळाला काय पाजत असतील?

तुम्हाला छंद जोपासायचे जरूर जोपासा, राहिलेल काम पूर्ण करा, भविष्याचा विचार करून आज पाऊले उचला.
ह्या संकटात आपण सगळे एक राहिलो तरच मात करू शकू.
दुसऱ्याला  दाखवायचं म्हणून काही करू नका.


हा फोटो तर खूप काही सांगून जातो. घरात किराणा भरायला पैसे नाही आणि यांना स्वतःची मजा मारायला आहेत पैसे.

आपण एका समाजात राहतो संविधानाने जस आपल्याला व्यक्ती स्वातंत्र दिल आहे जसे अधिकार दिला आहे तसेच आपली कर्तव्य सुद्धा बजावलं गेलं पाहिजे हे सुद्धा संविधानच सांगत. आपलं कर्तव्य निभवायची हीच वेळ आहे जरूर निभवूया.
( कुणाच्या भावनांना ठेच पोहचल्यास क्षमस्व 🙏)
पटल्यास जरूर share करा 

Wednesday, June 19, 2019

सत्तर तीन

मला आठवतं लहान असतांना म्हणजे दुसरी तिसरीत असेल, मला जोडाक्षरे वाचता येत नव्हती. मग सवय व्हावी म्हणून माझे बाबा मला वर्तमान पत्र वाचायला लावायचे. त्यात विशेषतः 'ख' लवकर समजून यायचा नाही, त्याची फोड करून मी त्याला ' र ' आणि ' व ' अस वाचायचे म्हणून काही माझ्या आई बाबांनी किंवा शिक्षकांनी मला तसेच वाच असं नव्हतं सांगितलं, त्यांनी वारंवार चूक सुधरवली म्हणून मी योग्य रीतीने शिकले.असंच तेव्हा प्रत्येकाच्या बाबतीत झालं असेलच.
मग त्या गोष्टीचा इतका बाऊ करण्यासारखं काय आहे? किती गोंधळ आहे हा शिक्षणाचा. 

Tuesday, May 7, 2019

आईस पत्र! letter to mom!

लिहिण्यास वाईट वाटत आहे कारण जेव्हा आई विषयी बोलायचं असत तेव्हा माझ्या शब्दांना वाचा च फुटत नाही.

पण हीच खरी वेळ आहे मला आई बद्दल जे प्रकर्षाने जाणवतंय ते लिहिण्याची.

माझी च आई नाही तर तुमची सुद्धा आई अशीच असेल, असेल कशाला अशीच आहे हे मी खात्रीने म्हणू शकते. कारण आई आई  असते तुमची असो व माझी. सगळ्यांच्या च जिव्हाळ्याचा प्रश्न.

तर आई बद्दल भरपूर काही !!!!

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला अभ्यासाबरोबर काम करायला लावायची,
पण लग्नानंतर समजलं तुला माझी काळजी, तुला माहित होत बाई म्हटलं कि शिक्षणा बरोबर चूल मूल आलंच.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला माझी चूक नसतांना सगळ्यांशी हसून खेळून रहायला शिकवलं,
म्हणूनच आज हि नणंद-भावजयी , सासू-सुने च छान जमलंय आणि जिवाभावाची नाती जपली गेलीये.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला माझी आवडती गोष्ट share करायला लावायची,
म्हणूनच आज माझ्या ताटातल्या अर्ध्या पोळीवर सुद्धा माझं पोट भरत.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला स्त्री- पुरुष समानता शिकवायची,
म्हणूनच आज नवर्याच्या खांद्याला खांदा लावायची क्षमता आहे.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू माझं कधी पोट भरून कौतुक केलं नाहीस,
म्हणूनच आज छोट्याश्या यशाने मी फुलून जात नाही.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला कधी एकट्याला जगू दिल नाही,
म्हणूनच आज मी सगळ्यांना सामावून घेऊ शकते.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला जास्तीत जास्त चांगलं वाचन करायला लावायची,
म्हणूनच आज माझे विचार प्रगत झाले आहे.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला मला हवी असलेली गोष्ट कधीच तेव्हाच्या तेव्हा दिली नाही,
म्हणूनच आज आहे त्या जीवनाचा आनंद मी घेऊ शकते.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला वस्तू जागच्या जागी ठेवायला लावायचीस किती उशीर झाला असेल तरी,
म्हणूनच आज संसार आणि नौकरी मी व्यवस्थित सांभाळू शकतेय.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू माझी वायफळ बडबड सुद्धा ऐकून घ्यायची नाही,
म्हंणूनच आज माझ्या शब्दांना महत्व आहे.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला व्यायाम करायला लावायचीस,
म्हणूनच आज मी फिट आहे.

हो आई मला राग यायचा जेव्हा तू मला इमोशनल असतांना प्रॅक्टिकल व्हायला शिकवायचीस,
म्हणूनच आज मी भावनेच्या भरात न जाता योग्य निर्णय घेऊ शकते.

हो आई अशा खूप गोष्टी आहे ज्यांचा मला राग यायचा पण आई आज मला आनंद होत आहे कि तू मला वेळोवेळी त्या गोष्टी शिकवल्या कधी कधी मनाविरुद्ध करवून सुद्धा घेतल्या,
म्हणूनच आज जेव्हा लोक माझं कौतुक करतात तेव्हा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतो.
  

Friday, May 3, 2019

महत्व अक्षय त्रितीयेचे | Importance of AKSHAY TRITIYA




वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. अक्षय तृतीया साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. 
हा एक शुभ दिवस मानला जातो. जे काही महत्वाचे काम असेल ते याच दिवसाचे औचित्त साधून केले जाते.

या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

महत्व  
  1. या दिवशी बद्रीनारायणाच्या बंद मंदिराचे दार उघडतात आणि दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी बंद केले जाते. 
  2. नर-नारायण या जोडीने याच दिवशी अवतार घेतला होता. 
  3. या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे असे श्री कृष्णाने युधिष्टिराला सांगितले होते.  
  4. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते. 
  5. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे. 
अक्षय तृतीयेला हे करावे 

  • या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.
                                                                                                 
  • या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.
  • या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
  • सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात

भारताच्या इतर राज्यात अक्षय तृतीया 
  • उत्तर भारत 
परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.
  • दक्षिण भारत 
लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते. अन्नदान करणे, मंदिरात जाणे असे आचरणात आणतात. 
  • पश्चिम बंगाल 
हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी वर्गात महत्वाचा दिवस मानला जातो. 

  • ओडिसा 
या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. लक्ष्मी देवीची पूजा करून नवीन धान्य पेरले जाते. जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो. 
  • राजस्थान 
आखा तीज या नावाने ओळखला जातो. या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे. 

Thursday, May 2, 2019

विलक्षण | VILAKSHAN

कीर्ती आणि राहुल ची जोडी सगळ्यांनाच आवडायची. त्यांचा प्रेम विवाहच आहे असच सगळ्यांना वाटायचं. छान चालला होता त्यांचा संसार. 
तस म्हणायला गेलं तर कीर्ती च्या आयुष्यात विलक्षण असं काही घडावं इतकं काही तिचं वय नाही. पण तिचा  स्वभाव बघता ती खूप भावनिक, संवेदनशील आणि कदाचित वया पेक्षा जास्त लवकर समज आल्याने जास्त विचार करणारी. 
घरात सर्वात लहान, लाडकी, हुशार, चुणचुणीत बालका पैकी एक. एकपाठी, शिस्तबद्ध, प्रामाणिक, सोज्वळ अशी कीर्ती. 
कामास काम ठेवणे हि शिकवण अगदी लहानपणापासून बाळगून ठेवलेली म्हणून च कि काय कोणाशी कधी भांडणाची वेळ आली नाही आणि एखाद्याला तिच्यासोबत भांडायचं जरी असेल तरी तीने त्याला तशी कधी संधीच देऊ दिली नाही. 
छोट्या छोट्या गोष्टींचा तिच्या मनावर खूप परिणाम व्हायचा आणि विचारांच्या जाळ्यात अडकून राहायची. म्हणूनच तिच्या आई ने तिला एकच गोष्ट सांगितली होती जेव्हा तिची जवळची मैत्रीण तिच्याशी चुकीचं वागली होती म्हणून तीने आई जवळ बोलून दाखवलं होत तेव्हा आई  बोलली तू जन्माला एकटीच आली आहेस आणि मरणार सुद्धा एकटीच आहेस तू ठरव तुला ह्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा आहे कि करिअर वर लक्ष द्यायचं आहे. आई च काही चूक नव्हतं तेव्हा कीर्तीचा स्वभाव पाहता तिच्या हितासाठी च बोलली होती ती. 


त्या नंतर तिला कुणाचा कधी राग केला नाही कि कोणासोबत स्पर्धा करावीशी वाटली नाही. ती जशी आहे तशी खुश होती. आई वडिलांच्या चौकटी बाहेर जायची कधी हिम्मत केली नाही आणि त्यातच तिला आनंद होता. आजू बाजूचे नातेवाईक तिच्या बद्दल भरभरून बोलायचे. 
तसेच तिचे बाबा सुद्धा काटेकोर, मान होता त्यांना समाजात, आणि याची जाण कीर्तीला होती. स्वाभिमानी माणूस स्वतःच्या कष्टाने नाव कमावलं होतं, कधी कोना समोर हात पसरवले नव्हते आणि तेच कीर्तीने अगदी अचूक हेरले होते. तिचे बाबा नेहमी म्हणायचे आपण स्वतः इतकं कमवायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं कि आपल्याला दुसर्याने नाकारायलाच नको. खूप स्वप्न पहिले होते त्यांनी कीर्ती साठी. 
ह्याच वातावरणात ती मोठी होत होती वयाने आणि डिग्री ने सुद्धा. हवी होती ती डिग्री भेटली आणि आता सर्वसामान्य मुली प्रमाणे तिच्याही घरचे तिच्या लग्नाचे स्वप्न रंगवू लागले. त्यांना जास्त स्थळ बघावे लागणार नाही हे पक्के माहित होत कारण कीर्ती तशी गुणी होती कोणाच्या हि मनात पटकन बसेल अशी होती. २२ वर्षे कधी आई वडिलांना सोडून न राहिलेली ती एका अनोळख्या व्यक्ती सोबत आयुष्य घालवणार होती. पण ती निर्धास्त होती तिचे बाबा जो कोणी मुलगा तिच्या साठी निवडतील त्याच्या सोबत ती डोळे झाकून लग्न करायला तयार होती आणि हे त्यांना माहित होत. 
कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि मुला कडच्यांनी लगेच पसंती कळवली. बाबा खूप खुश होते तिला हि विचारलं तिचा हि होकार होताच. घरात खेळीमेळीचं वातावरण होत. आता लग्नाची तयारी करायला हवी असं म्हणतच मुलाच्या आई ला बघायला यायचं असा फोने आला होता, तसे ते आले पण बरेच दिवस होऊनही काही उत्तर च नाही आलं. विचारपूस केली असता मुलगी सावळी आहे असं त्याच्या आई च म्हणणं होत जे चुकीचं होत म्हणून बाबा ची चिडचिड झाली होती, त्यांना मुलगा मनापासून पसंत होता आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार आहे आणि त्यांना हे स्थळ गमवायचा नव्हतं. काय करावं ते सुचत नव्हतं, त्यांनी मुलीला परत बघून घ्या हवं तर असं सुचवलं मुलाकडच्यांना. 
तिचे बाबा विचार करू लागले मी माझ्या मुलीला 'साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी' अशी शिकवण दिली पण हे विसरूनच गेलो समाजात त्याला काही किंमत नाही. स्वतःच्या मनाविरुद्ध ते हे सगळं करत होते मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता म्हणून. चांगलं स्थळ परत परत येत नाही हे त्यांना ठाऊक होत. 
जो स्वाभिमानी माणूस कधीही कोणासमोर हात न पसरवणारे कीर्तीचे बाबा आज मुलीच्या हिता साठी हेही करायला तयार झाले. कीर्ती सोबत कसं बोलावं हे त्यांना सुचत नव्हतं पण कीर्ती काही न सांगताच समजून गेली, ती काही बोलली नाही कारण तिला माहित होत तीने परत दाखवायचा कार्यक्रमाला नकार दिला तर बाबांना खूप वाईट वाटेल म्हणून स्वतःच्या मना विरुद्ध स्वतःचा रंग सिद्ध करण्यासाठी ती पुन्हा तयार झाली. 
मुलगा खरंच समजूतदार होता नंतर काही आढेवेढे न घेता होकार आला आणि लग्न मोठ्या आनंदात पार पडलं. 

पण कीर्ती साठी बाबांचं असं वागणं खूप विलक्षण होत, का कुणास ठाऊक त्या नंतर ती आपल्या रंगाबद्दल जास्त 
काळजी घेऊ लागली तिच्या मनात भीती बसली कि लग्नानंतर जर परत तिच्या सासूने बोल लावले तर?
तिला तिच्या बाबांनी पूर्ण स्वतंत्र दिलं होत ती हे स्थळ नाकारू शकली असती पण तिचे संस्कार म्हणा किंवा तिच्या आई बाबांचं प्रेम म्हणा तिच्या आड आलं आणि म्हणून तिने हा निर्णय घेतला. तिच्यावर कोणाची जबरदस्ती नव्हती. तिला फक्त बाबा असं का वागले याबद्दल तक्रार होती. नंतर तीही दूर झाली, पाहिलं तर कीर्तीच चांगलंच झालं होत, खुश होते दोघे. बाबांनी असा निर्णय घेतला याच महत्व तिला पटलं होत. बाबांचा निर्णय योग्य ठरला होता. 
पण आजही २१ व्या शतकात मुली इतक्या शिकून सगळ्याच क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत असतांना त्यांना रंग आड येतोच??
तुमच्याही आजूबाजूला हे घडतंच असेल ना. 

प्रत्येकाला गोऱ्या रंगाचीच बायको का हवी आहे? कधी बदलेल हि मानसिकता समाजाची ?


Tuesday, April 30, 2019

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा


मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

गोविंदाग्रज यांची हि कविता सगळ्यांनाच आठवणीत असेल. किती सुरेख वर्णन केलं आहे यात महाराष्ट्र च... 
तर असा हा महाराष्ट्र दिन १ मे रोजी मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. याच दिवशी गुजरात महाराष्ट्र पासून विभागला गेला. 
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. 
त्या हुतात्म्यांची नावे पुढीलप्रमाणे 
  1. सिताराम बनाजी पवार
  2. जोसेफ डेव्हिड पेजारकर
  3. चिमणलाल डी. शेठ
  4. भास्कर नारायण कामतेकर
  5. रामचंद्र सेवाराम
  6. शंकर खोटे
  7. धर्माजी गंगाराम नागवेकर
  8. रामचंद्र लक्ष्मण जाधव
  9. के. जे. झेवियर
  10. पी. एस. जॉन
  11. शरद जी. वाणी
  12. वेदीसिंग
  13. रामचंद्र भाटीया
  14. गंगाराम गुणाजी
  15. गजानन ऊर्फ बंडू गोखले
  16. निवृत्ती विठोबा मोरे
  17. आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
  18. बालप्पा मुतण्णा कामाठी
  19. धोंडू लक्ष्मण पारडूले
  20. भाऊ सखाराम कदम
  21. यशवंत बाबाजी भगत
  22. गोविंद बाबूराव जोगल
  23. पांडूरंग धोंडू धाडवे
  24. गोपाळ चिमाजी कोरडे
  25. पांडूरंग बाबाजी जाधव
  26. बाबू हरी दाते
  27. अनुप माहावीर
  28. विनायक पांचाळ
  29. सिताराम गणपत म्हादे
  30. सुभाष भिवा बोरकर
  31. गणपत रामा तानकर
  32. सिताराम गयादीन
  33. गोरखनाथ रावजी जगताप
  34. महमद अली
  35. तुळशीराम पुंजाजी बेलसरे
  36. देवाजी सखाराम पाटील
  37. शामलाल जेठानंद
  38. सदाशिव महादेव भोसले
  39. भिकाजी पांडूरंग रंगाटे
  40. वासुदेव सुर्याजी मांजरेकर
  41. भिकाजी बाबू बांबरकर
  42. सखाराम श्रीपत ढमाले
  43. नरेंद्र नारायण प्रधान
  44. शंकर गोपाल कुष्टे
  45. दत्ताराम कृष्णा सावंत
  46. बबन बापू भरगुडे
  47. विष्णू सखाराम बने
  48. सिताराम धोंडू राडये
  49. तुकाराम धोंडू शिंदे
  50. विठ्ठल गंगाराम मोरे
  51. रामा लखन विंदा
  52. एडवीन आमब्रोझ साळवी
  53. बाबा महादू सावंत
  54. वसंत द्वारकानाथ कन्याळकर
  55. विठ्ठल दौलत साळुंखे
  56. रामनाथ पांडूरंग अमृते
  57. परशुराम अंबाजी देसाई
  58. घनश्याम बाबू कोलार
  59. धोंडू रामकृष्ण सुतार
  60. मुनीमजी बलदेव पांडे
  61. मारुती विठोबा म्हस्के
  62. भाऊ कोंडीबा भास्कर
  63. धोंडो राघो पुजारी
  64. ह्रुदयसिंग दारजेसिंग
  65. पांडू माहादू अवरीरकर
  66. शंकर विठोबा राणे
  67. विजयकुमार सदाशिव भडेकर
  68. कृष्णाजी गणू शिंदे
  69. रामचंद्र विठ्ठल चौगुले
  70. धोंडू भागू जाधव
  71. रघुनाथ सखाराम बीनगुडे
  72. काशीनाथ गोविंद चिंदरकर
  73. करपैया किरमल देवेंद्र
  74. चुलाराम मुंबराज
  75. बालमोहन
  76. अनंता
  77. गंगाराम विष्णू गुरव
  78. रत्नु गोंदिवरे
  79. सय्यद कासम
  80. भिकाजी दाजी
  81. अनंत गोलतकर
  82. किसन वीरकर
  83. सुखलाल रामलाल बंसकर
  84. पांडूरंग विष्णू वाळके
  85. फुलवरी मगरु
  86. गुलाब कृष्णा खवळे
  87. बाबूराव देवदास पाटील
  88. लक्ष्मण नरहरी थोरात
  89. ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
  90. गणपत रामा भुते
  91. मुनशी वझीऱअली
  92. दौलतराम मथुरादास
  93. विठ्ठल नारायण चव्हाण
  94. देवजी शिवन राठोड
  95. रावजीभाई डोसाभाई पटेल
  96. होरमसजी करसेटजी
  97. गिरधर हेमचंद लोहार
  98. सत्तू खंडू वाईकर
  99. गणपत श्रीधर जोशी
  100. माधव राजाराम तुरे(बेलदार)
  101. मारुती बेन्नाळकर
  102. मधूकर बापू बांदेकर
  103. लक्ष्मण गोविंद गावडे
  104. महादेव बारीगडी
  105. कमलाबाई मोहित
  106. सीताराम दुलाजी घाडीगावक


याच दिवशी म्हणजेच १ मे ला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस ८० हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते .   
कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणार हा दिवस.. १९ व्या शतकात मे महिन्याच्या मध्यावर ह्या चळवळीला सुरुवात झाली ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती. 

छोट्या भावंडांना मासिक पाळी बद्दल पत्र

साधारणपणे आपल्याकडे मासिक पाळी सुरु होणं म्हणजे मुलगी वयात आली असं म्हणतात. भारतात अजूनही या विषयावर मोकळे पणाने बोलायला मुली लाजतात. समाज म...